अखेरपर्यंत लढविली खिंड : जयश्रीताई हारकर भी बनी ‘बाजीगर’! ताईंचा पराभव लागला अनेकांच्या जिव्हारी : ताई म्हणाल्या, संघर्ष संपला नाही..

अखेरपर्यंत लढविली खिंड : जयश्रीताई हारकर भी बनी ‘बाजीगर’!
ताईंचा पराभव लागला अनेकांच्या जिव्हारी : ताई म्हणाल्या, संघर्ष संपला नाही..
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीतील काही प्रमुख लढतीमध्ये हायहोल्टेज अशी लढत झाली ती, बुलढाणा मतदार संघात महाविका आघाडीच्या जयश्रीताई शेळके व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांच्यात.. प्रत्येक्ष क्षणी उत्कंठा वाढविणाऱ्या या लढतीमध्ये जयश्रीताईंचा केवळ 841 मतांनी पराभव झाला. मात्र निवडणूक हरल्यानंतरही ताई बाजीगर असल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले. पराभवानंतर माझा संघर्ष संपला नसून यापुढेही जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
बुलढाणा विधानसभा मतदार संघात सुरूवातीपासूनच महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काटे की टक्कर होणार असल्याचे दिसत होते. प्रचारादरम्यान मतदार संघात झालेली पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची सभा प्रचंड गाजली ती, ताईंच्या घणाघाती भाषणामुळे.. त्यांच्या भाषणाचे अक्षरश: पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील कौतूक केले होते. या सभेनंतर बुलढाणा मतदार संघात परिवर्तन घडणारच असे चित्र जागोजागी दिसून येत होते.
माहौलही तसाच झाल्याने विरोधकांतही अस्वस्थता निर्माण झाली होती. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकजुट करून प्रचारात एकतेचे दर्शन घडविले. त्यामुळे ताईंचा विजय निश्चीत होणार असे चित्र निर्माण झाले होते. एक प्रकारे बुलढाणा मतदार संघाची निवडणूक परिवर्तनवादी मतदारांनी स्वत:च्या हाती घेतल्याचे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिसून येत होते. मतमोजणी दरम्यान प्रत्येक फेरीमध्ये काट्याची टक्कर होत असल्याचे दिसून येत होते. अखेर अंतीम फेरीत केवळ 841 मतांनी ताईचा पराभव झाल्याचा निकाल आला अन् ताईंच्या समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली. हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. जनतेचे आभार व्यक्त करताना ताईंनी, माझा संघर्ष संपला नसून मतदार संघातील जनतेच्या समस्यांसाठी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण अविरत कार्यरत राहणार असल्याची ग्वाही ताईंनी यावेळी दिली. ताईंचा पराभव होऊनही त्या बुलढाणा मतदार संघाच्या बाजीगर ठरल्या असेच म्हणावे लागेल.