आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रयत्नांना यश- अखेर पेनटाकळीकरांचे घरांचे स्वप्न झाले साकार

*आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रयत्नांना यश- अखेर पेनटाकळीकरांचे घरांचे स्वप्न झाले साकार*
मेहकर दि १७
गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेल्या पेनटाकळी पुनर्वसन प्रकल्पाचा अखेर निर्णायक निकाल लागला असून, मौजे पेनटाकळी गावातील ४०१ नागरिकांना हक्काचे प्लॉट देण्यात आले आहेत. शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन गावकऱ्यांच्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीत मोलाची भर पडली आहे.
१९९८ पासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन प्रश्नासाठी गावकऱ्यांनी बारा दिवस प्रकल्पाच्या काठावर गावठाण हद्दवाढीसाठी उपोषण केले होते. त्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने लक्ष घालून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला आणि उपोषण सामोपचाराने सोडवले.
शासनाच्या मान्यतेनंतर ७ हेक्टर ८२ आर जागेवर एकूण ४०१ भूखंड तयार करण्यात आले. नियोजित आराखड्यानुसार समाजनिहाय या प्लॉट्सचे वाटप गावकऱ्यांना करण्यात आले असून, या ऐतिहासिक क्षणी आमदार सिद्धार्थ खरात स्वतः गावात जाऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात, तहसीलदार निलेश मडके, उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शहरप्रमुख किशोर गारोळे, युवा सेनेचे आकाश घोडे यांच्यासह, सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एम.जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, विस्तार अधिकारी शिवाजी पंडागळे, मंडळ अधिकारी गजानन ढोके, तलाठी सागर जायगुडे,ग्रा.पं.अधिकारीडी.बी.काळे, मोहन मगर, गजानन लहाने,जी.पी.मवाळ, सरपंच ,ग्रामस्थ, प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेनटाकळी पुनर्वसन प्रकरणाची अखेर योग्य निकाली निघाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आमदार खरात यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.