बातमी

ई-क्लास व वनजमिनी करणाऱ्या शेतकऱ्याना कायम पट्टे मिळावे यासाठी निघाला लॉग मार्च…

भारतीय समता संघटनेचा बुलढाणा ते मुंबई मंत्रालयावर निघाला लॉन्ग मार्च....

ई-क्लास व वनजमिनी करणाऱ्या शेतकऱ्याना कायम पट्टे मिळावे यासाठी निघाला लॉग मार्च…

 

भारतीय समता संघटनेचा बुलढाणा ते मुंबई मंत्रालयावर निघाला लॉन्ग मार्च….


भारतीय समता संघटनेच्या वतीने एक क्लास व वनजमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांना कायम पट्टे मिळावे यासाठी सामाजिक नेते नरहरी गवई यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री आम्रपाल वाघमारे यांच्या नेतृत्वात बुलढाणा ते मुंबई मंत्रालयावर पाई लॉन्ग मार्च निघाला आहे.

सन 1978 पासून ज्या आतापर्यंत ताब्यात असलेल्या शेतीचा सरकार चा शासन निर्णय असून सुद्धा सरकारच्या व महसूल अधिकाऱ्यांच्या लाल फीतशाहीत धोरणामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कायमपट्ट्यासाठी पात्र होणाऱ्या भूमीधारकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना कायम पट्टे मिळावे यासाठी आज बुलढाणा ते मुंबई मंत्रालयावर समता संघटनेच्या वतीने लॉंग मार्च काढण्यात आला.

गेल्या अनेक वर्षापासून पोटाची खळगे भरण्यासाठी गरीब वंचित भूमिहीन लोकांनी संसाराचा व परिवाराचा चरितार्थ चालवण्यासाठी शासनाच्या विना वापर पडून असलेल्या जमिनीवर स्वतः मेहनत करून शासनाच्या ई क्लास व वन जमिनी कायदेशीर कब्जात घेऊन त्यावर शेती प्रयोजनासाठी ताबा मिळवला आहे शासनाला वेळोवेळी सबळ पुराव्यानिशी अर्ज फाटे करून शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे अनेक दिवसांचा निकाली निघालेला प्रश्न प्रलंबित पडला असल्याचे म्हणत शासनाने शासकीय एक्लास वनजमिनी संदर्भात शासन निर्णय निर्गमित केलेला असून सुद्धा सरकारमधील महसूल अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करून शासकीय शेती कब्जाधारकांची टिंगल उडवीत आहे अनेक वेळा सरकार दरबारी आंदोलने सुद्धा केली असून सरकारने यावर कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे गोरगरीब भूमिहीन लोकांनी न्यायासाठी बुलढाणा ते मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला आमचा कुठलाही विरोध नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने घेतलेला निर्णय हा स्वागतारे असून तो प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावा परंतु शेतकऱ्यांचे हित सध्या करण्यासाठी सरकारने भूमीहीनांच्या ताब्यातील जमिनी घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे हे भूमिहीनांसाठी सामाजिक अन्याय केल्यासारखे होईल सरकारला जर शेतकऱ्यांना कायम वीज पुरवण्यासाठी हा प्रकल्प घ्यायचा असेल तर ताब्यात व वही ती जमूनीवर न घेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा भूमीहीनांच्या ताब्यात व वही ती असलेल्या जमिनीवर सौर ऊर्जेचे प्रकल्प घेत असेल तर भूमिनांच्या ताटात माती कालवण्यासारखे होईल तरी सरकार या महाराष्ट्राचे पालनहार असून भूमिहीनांच्या हिताचा सुद्धा निर्णय सरकारने घ्यावा या आशियाचे निवेदन देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे
या मोर्चात शुभम डोंगरदिवे नितीन कांबळे, शुद्धोधन गवई, रमेश गवई, धम्मपाल गवई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button