उकळी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते जोरदार स्वागत

मेहकर दि २३ बुलढाणा जिल्ह्यातील शाळांची घंटी आज वाजली असून मेहकर तालुक्यातील उकळी येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत आज आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले# शालेय शिक्षण विभागाच्या शंभर शाळांना भेटी कार्यक्रम उपक्रमा अंतर्गत आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज पीएम श्री जिल्हा परिषद शाळा उकळी शाळेला भेट देऊन कार्यक्रमांना हजेरी लावली व मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम गावातून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी काढण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी लेझीम कवायत सादर केली तर गावातील भजनी मंडळाच्या महिलांनी सुद्धा या दिंडीत सहभाग नोंदवला. ही दिंडी शाळेत आल्यावर इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आमदार सिद्धार्थ खरात व मान्यवरांनी स्वागत केले. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, पुस्तकांचे सुद्धा वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सिद्धार्थ खरात बोलले की आपल्या देशाला समृद्ध होण्यासाठी, प्रगतीपथावर जाण्यासाठी विमान, जहाज यांची आवश्यकता नसून माणसं घडवणारा जो कारखाना आहे त्यात सृजनशील शिक्षकांची आवश्यकता आहे व हे सृजनशील शिक्षक जिल्हा परिषद शाळेत मोठ्या संख्येने आहेत याचा अभिमान वाटतो. उकळी शाळेने आयोजित केलेला कार्यक्रम खरोखरच खूपच चांगला असून याचे सर्व श्रेय शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शाळेतील शिक्षकांना जाते.अशा जर शाळा असतील , शिक्षक असतील, संस्कार असतील तर आपला देश लवकरच सुपर पाॅवर होईल.विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत जे संस्कार व्हायला पाहिजे ते सर्व संस्कार जिल्हा परिषद शाळेत सुद्धा होतात. आज इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा प्रचंड मेहनत घेत आहेत व आपले नाव टिकवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नौकरी करताना सीईटी,टीईटी मधून जावे लागते. त्यामुळे यापुढे मी आमदार म्हणून विधानसभेत प्रश्न मांडताना व निधी मागताना सर्व जि.प. शाळांना भौतिक सुविधा तात्काळ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची मागणी करणार आहे असे उद्गार सुद्धा आमदार सिद्धार्थ खरात यांनी काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता घाटोळ होत्या तर कार्यक्रमाला सरपंच जनाबाई जेठे, उपसरपंच दिलीप नालेगावकर , शिक्षण विस्तार अधिकारी तथा संपर्क अधिकारी शरद काळे, केंद्रप्रमुख विलास शेळके ,उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शहर प्रमुख किशोर गारोळे, युवा सेनेचे तालुका अधिकारी आकाश घोडे, अमोल बोरे, सुरेश सोनुने, सत्यजित अर्बनचे संचालक सुरेश मुंदडा, मनोज लोहिया, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख नाजुकराव देशमुख ,उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन अंभोरे सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता नामदेव घाटोळ, उपसरपंच दिलीप नालेगावकर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एन जी देशमुख, सुरेश मुंदडा, मनोज लोहिया यांची सुद्धा भाषणे झाली .प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन अंभोरे यांनी केले. संचालन शिक्षक किरण डोंगरदिवे यांनी तर आभार विनोद दुतोंडे यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेतील ईतर शिक्षक दिलीप डव्हळे, शैलेश देशमुख, संदीप लादे, नरेश दसरे, शिक्षिका कुमारी नूतन महेश कुमार दीक्षित, सविता बबन रत्नपारखी, सविता यशवंत कावरे यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पांढरे, पोलीस पाटील नवले, विष्णू जेठे , रामेश्वर सासवडकर, राजेश अंभोरे, बाजीराव बोरे, रामेश्वर पातळे, तात्याराव तुरूकमाने, प्रकाश मोरे,कृपाळ ग्रामसेवक , आरोग्य, अंगणवाडी कर्मचारी सह गावातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.