विशेष बातमी

जनाधार लाभलेलं संघर्षशील नेतृत्व आदरणीय नामदार रामदासजी आठवले….!

जनाधार लाभलेलं संघर्षशील नेतृत्व आदरणीय नामदार रामदासजी आठवले….!

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांचा समस्त जीवन आणि कार्य समाजासमोर प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक अशा स्वरूपाच राहिलेल आहे.
बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे सर्वोच्च श्रद्धास्थान गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्या नंतर तो बंद करू शकतो.
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून स्वाभिमानाने जीवन जगा हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांची जीवनामध्ये आतापर्यंत वाटचाल राहिली आहे.
सांगली जिल्ह्यातील ठाले वाडी एक दुष्काळग्रस्त निर्जन गाव घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य बालपणीच वडील आदरणीय बंडुजी आठवले यांचं अकाली दुःखद निधन. वडिलांचे छत्र हरवल्या नंतर आई हौसाबाई यांनी अतिशय कष्टाने आपल्या या लाडक्या मुलाला चारित्र्य नीतिमत्ता व सदाचाराचे धडे दिले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तेजस्वी विचाराच बाळकडू दिले.
बालपणापासून रामदासजी स्वाभिमानी आणि निडर स्वभावाचे होते.
अन्यायाविरुद्ध त्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड असायची.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे आपण उच्च शिक्षण घेऊन आपण ज्या समाजामधून आलो आहोत त्या वंचित शोषित पिडित अन्यायग्रस्त समाजाला त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून दिली पाहिजे. या उदात्त हेतूने महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबई येथे दाखल झाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वडाळा हॉस्टेलमध्ये राहुन सिद्धार्थ महाविद्यालयांमध्ये ते शिक्षण घेऊ लागले.
मुंबईमध्ये आणि महाराष्ट्र मध्ये दलित समाजा वर अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत होत्या आणि अजून अत्याचाराच्या विरोधामध्ये भारतीय दलित पॅंथर नावाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी विचाराचं उच्चशिक्षित तरुणांचं संघटन मुंबईमध्ये मोठ्या जोमानं काम करत होतं.
ज्यामध्ये नामदेव ढसाळ ज. वी.पवार राजा ढाले व इतर अनेक तरुण समर्पित भावनेने काम करत होती.
अन्य अत्याचाराच्या विरोधात निधड्या छातीने लढत होती.
रामदास आठवले ही भारतीय दलितांचा चळवळीकडे प्रभावीत झाले.
त्यांनी आंदोलनामध्ये स्वतःला झोकून दिले. उत्तम संघटन कौशल्य
चळवळी विषयी असलेल समर्पण यामुळे अगदी काही दिवसांमध्ये आंबेडकरी समाजाच्या तरुणाईच्या गळ्यातला ते ताईत बनले.
त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली अगदी गल्लीपासून तर ते दिल्ली पर्यंत दलित शोषित पीडित वंचित जनतेचे आंदोलन अतिशय प्रभावीपणे त्यांच्या माध्यमातून समर्थ नेतृत्वाखाली पुढे जाऊ लागले.
महाराष्ट्र मध्ये पॅंथरची हवा निर्माण झाली.
अगदी गावागावामध्ये शहरा शहरांमध्ये
भारतीय दलित पॅंथरच्या शाखा निर्माण होऊ लागल्या.
पॅंथरच्या माध्यमातून प्रखर आंबेडकर वादावर उच्चशिक्षित चारित्र्यसंपन्न उच्चशिक्षित चारित्र्यसंपन्न त्यागी तरुणाच संघटन महाराष्ट्रात उभ राहिला.
रामदासजी आठवले त्यांनी पॅंथर चळवळीला तन-मंधनाने वाहून घेतले होते.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये महानगरामध्ये त्यांच्या विचाराला मानणारा त्यांच्यावर सर्वस्व अर्पण करणारा मोठा तरुण वर्ग निर्माण झाला होता.
कार्यकर्त्यावर त्यांनी अगदी लहान भावाप्रमाणे प्रेम केले.
त्यांचे सुखदुःख अडीअडचणी जाणून घेतल्या. आणि त्यामुळे अतिशय जिवाभावाचे
कार्यकर्ते निर्माण झाले.
अगदी सुरुवातीपासून त्यांना जोडलेला कार्यकर्ता आजही त्यांच्यासोबतच आहे. त्यांच्या समर्थ जनाधार नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये ज्येष्ठ साहित्यिक आंबेडकर विचारवंत कवी प्रा. अरुण कांबळे माजी मंत्री आदरणीय गंगाधर जी गाडे, एडवोकेट प्रीतम कुमार शेगावकर एस एम प्रधान दयानंद मस्के टी. एम. कांबळे बाबुराव कदम रतन कुमार पंडागले गौतम दादा भालेराव ऍड ऍड ब्रम्हणंद चव्हाण प्रकाश कांबळे प्रमोद रत्नपारखे शहीद विजय वाकोडे शहीद गौतम वाघमारे
ही व इतर पॅन्थर होती या सर्वांच्या संघटित प्रयत्नातुन त्यागातून समर्पनातून मराठवाडा विद्यापीठाला बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं.
रामदास जी आठवले यांनी पॅन्थर च समर्थ नेर्तुत्व केल त्यांच्या मधलं
नेर्तुत्व कर्तृत्व आणि आंबेडकरी समाजात व बहुजन अल्प संख्याक समाजातील असलेला त्यांचा जनाधार तत्कालीन मुख्यमंत्री देशाचं जुनं जाणत आदरणीय नेर्तुत्व शरद पवार यांनी ओळखलं व आपल्या मंत्री मंडळात त्यांचा समावेश सन्मानाने
कॅबिनेट समाजकल्याण मंत्री म्हणून केला. माझा समाज शासनकर्ती जमात बनला पाहिजे उच्च व दर्जेदार शिक्षण घेऊन माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा काबीज केल्या पाहिजे चारित्र्य नीतिमत्ता सदाचार आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाज निर्माण झाल्यानंतर समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास होता.
व्यापक समाज हित डोळ्यासमोर ठेवून शरद चंद्र पवार यांच्या मंत्री मंडळातते सहभागी झाले.
भारतीय दलित पँथर मध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांना त्यांचा विचार हा आवडला नाही.
भारतीय दलित तंत्र कोणाच्याही दावणीला बांधता कामा नये.
या भूमिकेतून त्यांच्यासोबत तात्विक मतभेद झाले.
परंतु त्यांच्यामध्ये सर्वांच्या प्रति मंगल मैत्रीची भावना आहे.
आपले पूर्वीचे पॅंथरचे सहकारी यांच्यासोबत त्यांचे ऋणानुबंध आहेत.
लोकसभेमध्ये शिर्डी मतदार संघामध्ये त्यांचा पराभव झाला त्यामुळे ते काँग्रेस व राष्ट्रवादीवर नाराज होऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन द्यायचं ठरवलं.
भारतीय जनता पक्षाला लोकसभेला स्पस्ट बहुमत मिळालं.
भारतीय जनता पक्षाने सन्मान पूर्वक राज्य सभेवर घेतलं.
आणि नंतर त्यांना केंद्र सरकार मध्ये सामाजिक न्याय मंत्री पद दिल.
गेली दशका पासुन आपल्या मत्रीपदाचा उपयोग व्यापक समाज हितासाठी समाज उद्धरासाठी ते करत आहेत.
सन्माननीय प्रधान मंत्री यांच्या मंत्री मंडळातील ऐक लोकप्रिय कार्य क्षम मंत्री म्हूणन त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
देशा मध्ये आंबेडकरी बहुजन समाजाचा सरकार मधील धाडसी चेहरा म्हणून त्यांच्या कडे आदराने बघितल्या जाते.
ज्या ठिकाणी दलित शोषित पीडित समाज वर अन्याय होतो त्या वेळी आदरणीय आठवले साहेब धावून जातात.प्रशांस नावर त्यांची छाप आहे.
अनेक वेळा ते मी अनुभवलं आहे.
कार्य कर्त्या वर अगदी सक्क्या भावा प्रमाणे त्यांचं प्रेम आहे.
येक दा त्यांना भेटलेले कार्य कर्ते कायम स्वरूपी
त्यांचे जिवाभावाचे ते होतात.
आज आदरणीय साहेबांचा वाढदिवस
या मंगल प्रसंगी त्यांना आयु आरोग्य बल वैभव प्राप्त होवो ही मनोकामना
पौर्णिमाच्या शीतल आल्हाद दायक चंद्रमा प्रमाणे त्यांचं आयुष्य प्रकाश मान होवो ही सदिच्छा….!


शुभेच्छुक
पत्रकार बाबासाहेब नागोराव जाधव
संपर्क प्रमुख बुलढाणा
रि. पा. इ.
आठवले गट.
९४२२५९१३२१

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button