बातमी

जागतीक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करुन केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन…

आयुर्वेदिक झाडांची लागवड करुन पर्यावरणआणि आयुर्वेदाला समृध्द करुया…

*आयुर्वेदिक झाडांची लागवड करुन पर्यावरणआणि आयुर्वेदाला समृध्द करुया…. ! जागतीक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करुन केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन…!!*

बुलढाणा (प्रतिनिधी),
पर्यावरण संवर्धनासाठी आयुर्वेदिक झाडांची लागवड करुन पर्यावरण संवर्धना सोबतच आयुर्वेदाला समृध्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टीक मुक्त अभियानात ही सर्वांनी सहभागी होऊन काम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथे केले.

दिल्ली येथील आयुष मंत्रालयाच्या परिसरात आयुष विभाग, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक पर्यावरण दिनाचे औचीत्य साधुन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन ५ जुन रोजी करण्यात आले होते. यावेळी केंद्रिय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या वृक्षारोपन कार्यक्रमाला आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापिठाच्या संचालिका श्रीमती वंदना सिरोवा, देवेंद्र त्रिगुना उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाशी आयुर्वेदाचा जवळचा संबध अधोरेखीत करत असतांनाच शाश्वत जिवन शैलीला प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टीक मुक्त अभियान राबविणे गरजेचे असल्याचेही केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगीतले. प्रत्येक नागरीकांनी आपल्या दैनदिंन जिवनामध्ये प्लास्टीक एैवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. अस आवाहन त्यांनी केले. प्लास्टीक मुक्तीसाठी समाजात जनजागृती करण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा. प्लास्टीक वापरापासुन सर्वांनीच दुर राहावे अस ही आवाहन यावेळी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप केंद्रिय मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button