*जिल्हयातील अवैध धंद्या विरोधात आ. गायकवाड यांची अधिवशनात लक्षवेधी*

*जिल्हयातील अवैध धंद्या विरोधात आ. गायकवाड यांची अधिवशनात लक्षवेधी*
जिल्हयात वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमिचा वाचला पाढा
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जिल्हयात वाढत चाललेल्या अवैध धंधाचा पाडा वाचत गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. सदर मागणी १८ डिसेंबर रोजी करण्यात आली.
जिल्हयात मागील अनेक महिण्यापासून सुुर असलेल्या कायदा व सुव्यवस्थे संदर्भात प्रश्न उपस्थित केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कारकिर्दीमध्ये बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये तीन जातीय दंगली झाल्या,आतापर्यंत लाखोंच्या संख्येने मोटरसायकल चोरी गेल्या, परंतु त्यांचा देखील पत्ता लागत नाही,त्यांची दखल ही पोलीस स्टेशनला घेतले जात नाही, घरफोड्या,चोऱ्या, वाटमाऱ्यांची संख्या ही हजारांच्यावर गेलेली आहे, अवैध दारू तसेच गावठी दारूचे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, तसेच मतदारसंघामध्ये भाजीपाल्याप्रमाणे वरली तसेच चकऱ्यांची दुकाने सुरू असल्याचा आरोप केला. जिल्हयात मध्यप्रदेश मधून येणारा अवैध गुटखा तसेच दारू ही सर्रासपणे शहरातील तसेच मतदारसंघातील पानटपऱ्यामध्ये लाखो रुपयांचे हप्ते देऊन विकल्या जातो, हजारोच्या संख्येने मतदारसंघातील अल्पवयीन मुली या बेपत्ता झाल्या परंतु पोलीस प्रशासनाला त्या शोधण्यात देखील अपयश आलेले आहे. तीन वर्षांपूर्वी आपल्या घरासमोरील गाडीला समाजकंटकांनी पेटवून दिले होते त्याचा शोध देखील आतापर्यंत पोलिस प्रशासनाला लावता आला नाही. वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक बळी आपण जाताना बघत आहे. हेल्मेट सक्ती असूनही हेल्मेट सक्ती करताना कोणीही दिसत नाही. जिलहयात जुगार व अवैध धंदे हे सर्रासपणे पोलीस अधीक्षकांच्या समोर सुरू असताना देखील त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. कारण पोलिसांचे लक्ष हे फक्त वसुलीवर आहे, परराज्यातून येणारे बटन नावाचे कॅप्सूल, गांजा, ड्रग्स,बॉण्ड हा नशा करून अल्पवयीन मुलं इतके बेधुंद होतात की त्यांच्याकडून एखादा गंभीर गुन्हा जरी झाला तरी त्यांना कळत नाही, त्यामुळे यावर देखील कोणताही बंधन घातले गेलेले नाही.
औचित्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करून या गैरप्रकाराला आळा घालण्याकरता शासन लवकरात लवकर कारवाई करणार आहे का असा महत्त्वपूर्ण मुद्दा यावेळी आमदार संजु गायकवाड यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला.
७० वर्षाची विधानसभेतील चर्चची प्रथा आ. संजय गायकवाड यांच्या विनंती करून बदलली
काल राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झाली. यात निम्मा वेळ सहा तासांपैकी सत्ताधारी व निम्मा वेळ विरोधकांना देण्यात आला. यावर आक्षेप घेत आ. संजय गायकवाड यांनी अध्यक्षांना विनंती केली की विरोधकाची संख्याही केवळ 46 आहे तर दुसरीकडील संख्या ही 242 आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांना सारखा वेळ देणे हे अन्यायकारक आहे असून संख्ये प्रमाणे वेळ देण्याची मागणी केली. या मागणीवरुन अध्यक्षानी ७० वर्षाची प्रथा बदलून तीन सत्ताधारी तर एक विरोधक असा निम्मा वेळ पेक्षा 25% वेळ विरोधकांना दिला