बातमी

तरुणाईच्या ‘ कार्यगौरव पुरस्काराचे थाटात वितरण..

निस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना जपणे काळाची गरज - जयश्रीताई शेळके

‘ तरुणाईच्या ‘ कार्यगौरव पुरस्काराचे थाटात वितरण..

निस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना जपणे काळाची गरज – जयश्रीताई शेळके

बुलडाणा

लोक भूमिका घेत नाही.कोणतीही असो डावी की उजवी… या बाजूने की त्या बाजूने, पण भूमिका घेतली पाहिजे. भूमिका न घेणारे लोक प्रसंगी घातक ठरले आहे. सुनील सपकाळ यांनी सामाजिक भूमिका घेत दीर्घकाळ कार्य केले. निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांची मुळातच कमी आहे. जे आहेत त्यांना जपणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन शिवसेना राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ यांना तरुणाई फाउंडेशन च्या वतीने घोषित करण्यात आलेल्या कार्यगौरव पुरस्काराचे वितरण जिजाऊंचे तेरावे वंशज शिवाजीराजे जाधव,पत्रकार गणेश निकम, कैलास राऊत यांच्या हस्ते एक जुलै रोजी ‘ देशमुख गढी ‘ हातेडी या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी राजे जाधव होते.तर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, भाऊसाहेब शेळके, जिल्हा बँकेचे सीईओ डॉ.अशोकराव खरात, डॉ. अरविंद कोलते,प्रा. डी एस लहाने, मुक्तारसिंग भाऊ राजपूत,बाबासाहेब भोंडे, पी डी सपकाळ, सदानंद देशमुख,कर्नल जतकर,डॉ. शोन चिंचोले,माजी सभापती दिलीपराव जाधव , एडवोकेट जयसिंगराजे, डॉ.गजानन पडघन, डॉ.विकास बाहेकर,अनंत शिरसाट,साहित्यिक सुरेश साबळे, शाहिनाताई पठाण ,नंदिनी टरपे, पद्माताई लांजेवार,पत्रकार संदीप वानखेडे,गणेश उबरहंडे,अमोल रिंढे,सुजित देशमुख,अनिल गाढे,विजय घ्याल, मोहम्मद सोफियान आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात विशेष सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना जिल्हा भूषण व कार्य भूषण पुरस्कार तरुणाई फाउंडेशन देऊळगाव मही च्या वतीने दरवर्षी देण्यात येतो.यावर्षी साठी सुनील सपकाळ यांची निवड करण्यात आली होती. सुनील सपकाळ यांनी गेल्या तीन दशकापासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.राजकारणामध्ये सक्रिय असले तरी त्यांचा खरा पिंड हा सामाजिकतेचा राहिला असल्याचे प्रास्ताविकामध्ये एडवोकेट जयसिंगराजे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी डॉक्टर कोलते, जालिंदर भाऊ बुधवत आदींनी विचार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना सुनील सपकाळ यांनी कार्य गौरव मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. चांगल्या गोष्टीच्या पाठीशी उभे राहणे, चांगल्या विचारांना बळ देणे हे विचार बुलढाणा जिल्ह्यात आणि शहरांमध्ये आजही तेवत असल्याचे ते म्हणाले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्य गौरव पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले.यावेळी शहरातून विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित झाली होती. संचलन पत्रकार राजेंद्र काळे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश सिंग राजपूत यांनी केले.

*बुलढाण्याने सामाजिक कार्य करणारी रत्न दिलीत- शिवाजी राजे*

बुलढाण्याने सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी अनेक रत्ने दिली.पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नाव उज्वल केले. तर आता राजकारण, समाजकारण विविध आघाड्यांवर सुनील सपकाळ हे नाव गाजत आहे.यांनी केलेले कार्य हे ऐतिहासिक नोंद घ्यावी असेच असल्याचे शिवाजीराजे जाधव म्हणाले. बुलढान्यात अवघड कार्य सहज सोपे करणारी चाबी असा उल्लेख डॉक्टर कोलते यांनी करून सुनील सपकाळ यांच्या कार्याची माहिती दिली.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button