देऊळगाव माळीच्या मातीत वाघ्या मुरळीच्या घुंगराचा नाद; राज्यस्तरीय वाघ्या मुरळी स्पर्धा संपन्न.
दे.माळी ; गावाने जपला लोककलेचा वारसा. तब्बल आठ तास वाघ्या मुरळीचे नृत्य.

देऊळगाव माळीच्या मातीत वाघ्या मुरळीच्या घुंगराचा नाद; राज्यस्तरीय वाघ्या मुरळी स्पर्धा संपन्न.
दे.माळी ; गावाने जपला लोककलेचा वारसा.
तब्बल आठ तास वाघ्या मुरळीचे नृत्य.
विजेते; शिव मल्हार वाघे मंडळ ,धोत्रा नंदाई ज्यांनी पटकावला प्रथम क्रमांक.
देऊळगाव माळी
बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्राचीन कला आजही जीवंत ठेवल्या आहेत.
जागरण, गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तोच घुंगरांचा नाद मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे वाघ्या मुरळीची राज्यस्तरीय भव्य स्पर्धेत गुंजला.
यामध्ये परभणी ,औरंगाबाद ,बुलढाणा ,जालना ,नाशिक ,जळगावासह इतर जिल्ह्यातील वाघ्या मुरळी पार्टीने सहभाग नोंदविला होता.
या वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळ स्पर्धेच्या कार्यक्रमांमधून स्त्री भ्रूणहत्या, लेक वाचवा, लेक शिकवा, व्यसनाधीनता, ग्रामस्वच्छता, स्वच्छ भारत मिशन, हुंडाबंदी, दारूबंदी, बालविवाह नको, एकत्र कुटुंब पद्धती, आई-वडिलांचा सांभाळ करा, वृद्धाश्रम नको, अशा अनेक समाजप्रबोधनाच्या गीताच्या माध्यमातून समाज जागृती करत ही भव्य दिव्य स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत शिव मल्हार वाघ्या मंडळ धोत्रा नंदाई या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला
वाघ्या-मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हणून ओळखले जाते. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जन्माला येऊनही जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करायचे.नवसानंतर जन्मास आलेले मूल खंडोबाला अर्पण केले जायचे. मुलगा असल्यास त्याने वाघ्या; तर मुलगी असल्यास तीने मुरळी म्हणून संपूर्ण जीवन जगायचे, असा वाघ्या-मुरळीचा इतिहास असल्याची माहिती जाणकार देतात.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची एकूण 11 ठाणी असून तेथे लग्न, मुंजीनंतर वाघ्या-मुरळींकडून जागरण घातले जाते अशी महाराष्ट्रात संस्कृती आहे.
वाघ्या-मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हणून ओळखले जाते. त्या खंडोबारायाच्या जागर करण्यासाठी मागील तीन वर्षापासून दे.माळी येथे भव्य राज्यस्तरीय वाघ्या मुरळी स्पर्धा आयोजित केली जाते. 18 फेब्रुवारी रोजी तब्बल आठ तास चाललेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण ए. बळी उपजिल्हाप्रमुख किसान आघाडी,हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रकाशभाऊ डोंगरे उपजिल्हाप्रमुख युवा सेना, उपसरपंच रंगनाथ चाळगे, राज वडतकर, योगेश कंकाळ, पत्रकार समाधान चिंचोले, तुकाराम मगर, (पंच – जगन्नाथ चांगाडे, डॉ. बद्री मगर, माधव सखाराम मगर ,दत्ता घुगे दुसरबिड) पो. पा.गजानन चाळगे, संपादक कैलास राऊत,दुर्गादास काटे महाराज , बळीनाथ गिरी महाराज, रवींद्र गुरव महाराज खामगाव, सुखदेव वानरे, पञकार रवींद्र सुरूशे ,यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काटे महाराज यांनी केले .
रात्री आठ ते पहाटे चार पर्यंत सातत्याने आठ तास चाललेल्या या स्पर्धेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार दै. बातमीजगचे मुख्य संपादक कैलास राऊत यांनी केले.
*हे ठरले विजेते*
प्रथम ;शिव मल्हार वाघे मंडळ धोत्रा नंदई, द्वितीय ;जय मल्हार वाघे मंडळ बोरगाव काकडे, तृतीय; शिव मल्हार वाघे मंडळ किनगाव राजा, चतुर्थ; गुरुकृपा जागरण गोंधळ पार्टी केशव शिवनी, पाचवा क्रमांक; जय मल्हार वाघे मंडळ मलकापूर पांगरा, तर सहावी बक्षीस जय मल्हार वाघे मंडळ अंजनी खुर्द यांनी पटकावले. याचं अनेक जिल्ह्यातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. विजेत्यांना मोठ्या रकमेचे बक्षीस देण्यात आले.
*यांनी जपली सांस्कृतिक परंपरा..*
मागील तीन वर्षापासून नारायण बळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन सुरेश जाधव, बद्री चाळगे ,विशाल चाळगे, गणेश तायडे, श्रीकृष्ण ढवळे, कैलास चाळगे, शंकर चाळगे, शिवाजी चाळगे ,भीमराव गायकवाड, अशोक वाघमारे ,हे सातत्याने तीन वर्षापासून कार्यक्रमाचे आयोजन करून ही लोककला जपत आहे.
*यांचे दातृत्वासाठी एक पाऊल पुढे.*
स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रकाशभाऊ डोंगरे उपजिल्हाप्रमुख, मा. जि .प .सदस्य संजय वाडकर, योगेश कंकाळ, रवींद्र पुरी मुंबई, गणेश एस.बळी, संदीप पी.भराड, सतीश ताजणे, ओम कृषी केंद्र भागवत मगर, कन्हैया कुंडलिक राऊत, जगन्नाथ रंगनाथ मदने, पहिलवान ऋषिकेश चाळगे यांच्यासह अनेकांचे दातृत्वाच्या भूमिकेतून हात स्पर्धेसाठी पुढे असतात.