बुलढाण्याचे वामनदादा कर्डक प्रतिष्ठान डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र सरकारच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्काराचे थाटात झाले वितरण

बुलढाणा (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय खात्याकडून देण्यात येणाऱ्या विविध समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवार दि 10 जून 2025 रोजी मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेन्टर च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यात व्यक्तीला वयक्तिक स्वरूपाचा आणि संस्था गटातून समाजाभीमुख कार्य करणाऱ्या संस्थाना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप व्यक्तीसाठी रु.75000/- रोख तर संस्थेसाठी रुपये .एक लक्ष याप्रमाणे एकूण दहा संस्था आणि 61 व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये बुलढाणा शहर आणि परिसरात गेल्या मार्च 2003 पासुन म्हणजे गेल्या 23 वर्षांपासून कार्यरत असलेल्या *लोककवी वामनदादा कर्डक बहू.उद्देशीय प्रतिष्ठान बुलढाणा* या संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार संस्थेच्यावतीने सचिव साहित्यिक सुरेश साबळे अध्यक्ष शाहिर डी आर इंगळे यांनी स्वीकारला. यावेळी स्टेजवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे,सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ,मंत्री भरत गोगावले मंत्री संजय राठोड,आमदार संतोष बांगर,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे आयुक्त पुरी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषाच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करुन व द्विप्रज्वलीत करुन मान्यवरांनी उदघाट्न केले.स्वागतपर मनोगत सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांनी मांडले तर प्रास्ताविक प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी केले.मुख्यमंत्री यांच्या प्रमुख भाषणात त्यांनी सांगितले कि,मंत्री सिरसाट यांनी समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींना त्यांच्या साथीदारासह एस टी च्या सर्वच बसेसमधून मोफत प्रवास देण्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात सन 2023-24 च्या पुरस्कारात संत रोहिदास समाजभूषण पुरस्कार,लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाजभुषण पुरस्कार,पद्मश्री कर्मवीर दादासाहेब कृष्णराव भाऊराव गायकवाड पुरस्कार आदी. पुरस्काराचेही वितरण याच समारंभात करण्यात आले.या महाराष्ट्राच्या विविध भागातून पुरस्कार प्राप्त व्यक्ती,साथीदार आपटेष्ट आणि मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांच्या भरगच्च उपस्थितीत गौरव समारंभ पार पडला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.