बातमी
माळविहिर पाणी प्रश्न पेटला….. राम प्रहरात ग्रामस्थ पोहोचले ग्रामपंचायत मध्ये

माळविहिर पाणी प्रश्न पेटला…..
राम प्रहरात ग्रामस्थ पोहोचले ग्रामपंचायत मध्ये
बुलढाणा शहराला लागून असलेल्या माळविहिर माळवीर ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन नगर आणि विश्वास नगर परिसरात नव्याने झालेल्या पाईपलाईनमुळे जुनी पाईपलाईन गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. आणि बऱ्याच ठिकाणी पाईप लाईन फुटल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने त्रस्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायतवर मोर्चा वळवला….वारंवार तक्रार करून देखील ठेकेदार आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लवकरात लवकर जुनी पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी किंवा नवी पाईपलाईन तात्काळ सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.