बातमी

मेहकर चे परिवर्तनाचे वारे जिल्हा भर खेळणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी आघाडीवरच असणार.. आ. सिद्धार्थ खरात

आ सिद्धार्थ खरात यांनी निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन पूर्ततेच्या दिशेने वाटचाल सुरू

मेहकर चे परिवर्तनाचे वारे जिल्हा भर खेळणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी आघाडीवरच असणार.. आमदार सिद्धार्थ खरात

आ सिद्धार्थ खरात यांनी निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन पूर्ततेच्या दिशेने वाटचाल सुरू

मेहकर:- आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर विधानसभा मतदार संघातील मागील सहा महिन्याचा यशस्वी आराखडा पत्रकार परिषदेत मांडला
आज दिनांक 28 मे 2025 रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सहा महिन्याच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचा लेखाजोखा पत्रकर परिषदेमध्ये मांडला प्रामुख्याने मेहकर शहरातील एमआयडीसी तिल अतिक्रमन हटवण्यात आले 1989 मध्ये ही जागा एमआयडीसी साठी 53 एकर जागा देण्यात आली मात्र बहुतांश जागेवर अतिक्रमन करण्यात आले असल्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय निर्माण झाले नाही परिणामी एक असंतोष या भागातील तरुणांमध्ये उद्योजकांमध्ये व्यवसायिकामध्ये निर्माण झाला होता.
सिद्धार्थ खरात यांनी निवडणूक काळात याबाबत एमआयडीसी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने श्री खरात यांनी एमआयडीसी व उद्योग विभाग तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला व 1989 पासून जे अतिक्रमण झाले होते ते अतिक्रमण काढण्यात /त्यांना यश मिळवले आहे. या ठिकाणी आता 15 एमआयडीसीचे प्लॉट उपलब्ध झाले असून लवकरच त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. व ज्यांना या ठिकाणी उद्योग व्यवसाय करायचे आहे त्यांच्यासाठी आता हा मार्ग मोकळा झाला आहे श्री खरात पुढे बोलताना असे म्हणाले की 53 एकर जागेमध्ये एमआयडीसी च्या गरजा पूर्ण होणार नाहीत म्हणून अतिरिक्त 500 एकर ची जागा एमआयडीसी ने महसूल प्रशासनाकडे मागितलेली आहे महसूल विभागाकडून याबाबत आढावा घेण्यात येत असून कमीत कमी दोनशे एकर जागा शासकीय अथवा खाजगी स्वरूपातली जागा भूसंपादन करून देण्याचे आश्वासन आमदार महोदयांना दिल्याचे त्यांनी सांगितले असे झाले तर एमआयडीसीचा जो मार्ग आहे तो अधिक प्रशस्त होईल असा विश्वास श्री खरात यांनी व्यक्त केला त्याचबरोबर मेहकर शहरात तिल अतिक्रमण काढून टाकण्यात आले व त्यामुळे जे गाळा धारक त्या ठिकाणी रस्त्यावर आले त्या सर्व गाळेधारकांना बस स्टॅन्ड समोरील तीनशे प्लॉटची वाटप करण्यात येणार असून लवकरात लवकर याबाबतची गाळाधारक गाळा वाटप वितरणाचे कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले याबाबतची निविदा अंतिम स्तरावर असून त्याबाबतचा निर्णय लवकरच होणार असल्याचे खरात यांनी सांगितले हे खरात यांनी पुढे असे सांगितले की पेन टाकळी हा मध्यम स्वरूपाचा प्रकल्प सुरू झाल्यापासून पेनटाकळी गावामध्ये निवासाचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता गावठाण जमिनीची हद्द वाढ या कारणामुळे होऊ शकली नव्हती तो प्रश्न निवडणूक पूर्व काळामध्ये आश्वासन दिले होते त्याचा पाठपुरावा करून त्यांनी हा प्रश्न धसास लावला पेनटाकळी प्रकल्पातील 401 नागरिकांना पेनटाकळी येथे प्लॉटचे वाटप करण्याचे माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाची घटना असल्याचे आमदार खरात यांनी सांगितले कारण हा विषय राजकारणाच्या पलीकडचा असून सामाजिक ऐक्य ठेवण्याच्या दृष्टीने गावकऱ्यांनी सामंजस्यांनी सोडवला याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले श्री खरात यांनी अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा विषय यावेळी मांडला तो म्हणजे शेतकऱ्यांचा सोयाबीन हे मुख्य पीक शेतकरी घेतात बुलढाणा जिल्हा हा 83% ग्रामीण आहे व 75 ते 80 टक्के पेरा सोयाबीनचा शेतकरी करतात मात्र सोयाबीनचे जे भाव आहे.तो अतिशय अल्प आहे आणि त्याचा प्रति एकरी उत्पादन आणि मिळणारी किंमत याचा अतिशय कमी आहे. म्हणून याला पर्याय म्हणून मक्का,हळद लागवडीकडे वळावे तसेच शेतकऱ्यांनी फळबागाच्या संदर्भात सिताफळ आणि संत्रा या पिकावर शेतकऱ्यांनी जोर द्यावा त्यांनी उत्पादित केलेल्या फळांना योग्य ते बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही कृषी विभाग व पणन विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे आश्वासन यांनी दिले एकूणच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण जीवनाची उन्नती करण्याच्या दृष्टीने पायाभूत सोयी बरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सर्व बाबींची हाताळणे आमदार सिद्धार्थ खरात यांनी यशस्वीपणे सुरू केल्याचे या सहा महिन्याच्या त्यांच्या या कार्यकाळात दिसून आले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button