सिध्दार्थ खरातांच्या रूपाने तब्बल पंधरा वर्षानंतर मेहकरला मिळाले अभ्यासू “आदर्श नेतृत्व”

सिध्दार्थ खरातांच्या रूपाने तब्बल पंधरा वर्षानंतर मेहकरला मिळाले अभ्यासू “आदर्श नेतृत्व”
आता जनतेला पडू लागलीत विकासाची स्पप्न : मिळणार दहशत, भयापासून संरक्षण
मेहकर : विधानसभा निवडणुकीच्या निकालात मतदारांनी एैतिहासिक परिवर्तन घडवून महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिध्दार्थ खरात यांनी शिवसेना शिेंदे गटाचे डॉ. संजय रायमूलकर यांना धोबी पछाड देत विजय संपादन केला. त्यामुळे मेहकर मतदार संघाला तब्बल पंधरा वर्षानंतर अभ्यासू, सुसंस्कृत व संयमी नेतृत्व लाभले आहे.त्यामुळे मतदार संघातील जनतेला विकासाची स्वप्ने पडू लागली असून गेल्या अनेक वर्षापासून दहशतीखाली वावरणाऱ्या सुसंस्कृत जनतेला दडपशाही व भयापासून संरक्षणाची हमी मिळाली आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून मेहकर मतदार संघात एकचं नेतृत्व सत्तेत असल्याने मतदार संघाच्या विकासकामाचा प्रचंड खोळंबा झाला होता. जनतेला रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने जनतेत तत्कालीन आमदाराविषयी प्रचंड रोष निर्माण झाला होता. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी सिध्दार्थ खरात यांनी मंत्रालयीन सचिवपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मेहकर मतदार संघातील जनतेशी संवाद साधने सुरू केले. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत शिवबंधन बांधले. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाविकास आघाडीकडून मेहकर मतदार संघासाठी उबाठा पक्षाची उमेदवारी दिली. प्रचारादरम्यान त्यांनी मेहकर मतदार संघातील प्रत्येक गाव पिंजून काढत जनतेशी संवाद साधला. सर्वजाती धर्मातील मतदारांशी त्यांच्या समस्याविषयी चर्चा केली. निवडणुकीपूर्वी एैतिहासिक रोजगार मेळावा घेऊन एकाचवेळी सहाशे युवक,युवतींना ऑन द स्पॉट रोजगार मिळवून दिला. अत्यंत हायहोल्टेज असलेल्या मेहकर मतदार संघाच्या लढतीमध्ये यावेळी मेहकर मतदार संघात परिवर्तन घडणार या भावनेने मतदारांनीच ही निवडणूक हाती घेतली होती. अनेक वर्ष मंत्रालयात सचिव, सहाय्यक सचिवपदावर कामकाज केल्याने त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. निधी कुठून आणि कसा आणायचा याचा त्यांना सुक्ष्म अनुभव आहे. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर मेहकर मतदार संघाला औद्योगिक हब बनविण्याचा त्यांचा संकल्प असून त्यांच्या नेतृत्वाखाली मेहकर मतदार संघाचा कायापालट होणार असल्याचा ठाम विश्वास मतदार संघातील जनता व्यक्त करीत आहे