सामाजिक,आर्थिक व समाता आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी प्रस्थापित होऊ दिली नाही…आ सिद्धार्थ खरात
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

सामाजिक,आर्थिक व समाता आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी प्रस्थापित होऊ दिली नाही…आ सिद्धार्थ खरात
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
मेहकर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बामसेफ जिजाऊ ब्रिगेड माळी समाजसेना जमायचे मुस्लिम हिंद अहिल्याबाई होळकर धनगर समाज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनीयर दिनकर शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा योगेश्वर निकस, लिंबाची पांडव किशोर गारोळे, एड संदीप गवई, तुळशीराम मानघाले, राखीव जनाब,माधवराव ससाणे, अर्चना गोरे, अशोक तुपकर, विलासराव तेजनकर, गजानन शेळके, प्रल्हाद भिसे, संजीवनी वाघ आकाश घोडे सदानंद पाटील एडवोकेट विजय बच्छिरे संतोष ढोकरे नितीन पिसे मधुकर झाल्टे विजय खंडागळे संदीप पागोरे विनोद गोरे आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांची वीरता आणि पराक्रम पाहून नवयुवकांमध्ये चेतना निर्माण होते व त्या युवकांनी संभाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून देश सेवेसाठी तत्पर राहावे तसेच या महाराष्ट्राची विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वारकरी चळवळ वसंत चळवळ यावरच महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण चालायला हवं तसेच संविधानाने दिलेली समता न्याय आणि बंधुत्व असताना गेल्या 75 वर्षात अद्यापही समाजात समता आलेली नाही सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय झाला नाही आज पर्यंत च्या राज्यकर्त्यांनी ही सामाजिक समता प्रस्थापित होऊ दिली नाही त्याला हे राज्यकर्तेच जबाबदार असल्याचं प्रखर मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले.
या रक्तदान शिबिरात प्राध्यापक डॉ योगेश्वर निकस संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पाटील, भगवान तांगडे,उमेश राजपूत, संदीप मानगे, महेश भुतेकर, विशाल टाले, अमर मैराळ, शुभम लहाने, विष्णू देशमुख, सचिन पायघन, दीपक मोठे, मोतीराम पायघन, रुपेश खडसे यासह आदींनी यावेळी रक्तदान केले