बातमी

राज्यस्तरीय ज्ञानपंख गौरव पुरस्काराने चिखली येथील शर्मा, काळे, डोंगरदिवे व महाजन विविध पुरस्काराने सन्मानित

राज्यस्तरीय ज्ञानपंख गौरव पुरस्काराने चिखली येथील शर्मा, काळे, डोंगरदिवे व महाजन विविध पुरस्काराने सन्मानित

 

 


चिखली : समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि आपले ज्ञानपंख वृत्त पत्र आयोजित राज्य स्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सिल्लोड येथे नुकतेच संपन्न झाले. यामध्ये चिखली येथील पत्रकार योगेश शर्मा यांना “राज्यस्तरीय लेखणीची धार उत्कृष्ट पत्रकार ज्ञानपंख गौरव पुरस्कार”, संतोष काळे पाटील यांना “राज्यस्तरीय युवा उदयोजक सन्मान गौरव पुरस्कार”, प्रशांत डोंगरदिवे यांना “अनाथाचा आधार सन्मान गौरव पुरस्कार” तर सारंग महाजन यांना “सामाजिक कार्यकर्ते ज्ञानपंख गौरव पुरस्कार” अध्यक्ष – डी. एन्. जाधव, संपादक – झेप तथा समीक्षक, औरंगाबाद, उदघाटक – प्राचार्य एन्. बी. चापे, सुप्रसिद्ध साहित्यिक, सिल्लोड, प्रमुख अतिथी – डॉ. ऋषीकेश कांबळे, फुले- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक, प्रा. शिवाजी वाठोरे, ज्येष्ठ साहित्यिक, सिल्लोड, तथा सामाजिक सेवा कार्यास्तव अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, अध्यक्ष बहुजन साहित्य संघ, तथा राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष – केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली, तसेच या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजक दशरथ सुरडकर, ज्ञानपंख अध्यक्ष तथा न्यूज चॅनेल संपादक, सिल्लोड यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सविस्तर असे कि पत्रकारिता च्या माध्यमातून गोर गरीब जनतेला न्याय देत अन्यायला वाचा फोडत विविध वृत्तपत्र व टेलिव्हीजन सोबत जनसामान्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देत सर्वांना आपलसं करीत शून्यातून विश्व् निर्माण करणारे चिखली तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय लेखणीची धार उत्कृष्ट गौरव पुरस्कार देण्यात आला, तर मौजे भोकर येथील प्रतिष्ठित आई वडिलांच्या पुण्याई ने व स्वतः च्या मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर अत्यल्प कालावधीत स्वयंउद्योगाच्या माध्यमातून आजच्या नवयुवकां समोर एक नवा आदर्श निर्माण करीत अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून स्वतः च्या पायावर उभे करणारे कष्टाळू व प्रगतशील युवा उद्योजक संतोष काळे पाटील यांच्या कार्याची दाखल घेत यशस्वी युवा उद्योजक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर बहुजन चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक काम करीत आज तुकाराम आश्रय वृद्धाश्रम च्या माध्यमातून बेघर, निराधार, बेवारस, वयोवृद्ध आजी आजोबा यांच्या निःस्वार्थ निरंतर सेवेत वाहून घेणारे प्रशांत डोंगरदिवे यांना अनाथाचा आधार जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सारंग महाजन यांनी गर्वी फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात काम करीत असून मेडिकल कॅम्प, मेडिकल चेकअप, वृक्षारोपण, अत्यंत कमी दरात कॉम्प्युटर कोर्स उपलब्ध करून देणे असे सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सारंग महाजन यांना ज्ञानपंख गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्वांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने सर्वच स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होता असून सर्वत्र कौतुक होत आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button