बातमी

बुलढाण्यात आरपीआयच्या वतीने भारत जिंदाबाद यात्रा संपन्न

*भारत जिंदाबाद यात्रा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्ष्याच्या वतीने बुलडाणा येथे दि.07/06/2025 ला रोजी काढण्यात आली*
या अनुषंगाने काश्मीर मधील पैलगाम मध्ये जो पाकिस्तानच्या आतंकवाद्यानी निष्पाप भारतीयांचा क्रूरपणे बळी घेऊन हत्या केली या घृण कृत्याचा निषेधार्थ भारताचे आम्हचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी सिंदूर 2.0 हे ऑपरेशन राबविले आणि पाकिस्तान ला धडा शिकवला. त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर मा.ना.श्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीयराज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार बुलडाणा येथे रि.पा.ई.चे सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलडाणा तालुका अध्यक्ष केशव सरकटे यांनी केले,तसेच या कार्यक्रमात माणवंदना देण्यासाठी विदर्भ कार्याध्यक्ष मुरलीधर गवई, विदर्भ महिला उपाध्यक्ष सौं.आशाताई वानखेडे,जिल्हा संपर्क प्रमुख श्री बाबासाहेब जाधव,महिला जिल्हाअध्यक्ष सौं.वंदनाताई वाघ,एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाअध्यक्ष विजयजी मोरे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाअध्यक्ष नवाब बेग मिर्झा युवा जिल्हाअध्यक्ष प्रकाश पाटील म्हस्के,युवा महिला जिल्हाअध्यक्ष पूनमताई राऊत, जिल्हाकार्यध्यक्ष प्रा.मूकतार खा पठाण सर,युवाजिल्हासचिव संदीप भालेराव,लोणार तालुका अध्यक्ष समाधान सरदार, मोताळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब अहिरे,मेहकर तालुका अध्यक्ष राहुल अवसरमोल,युवातालुका अध्यक्ष उषाताई इंगळे,सौं. मीराबाई जैस्वाल,साहिल अहिरे,जीवन इंगळे या कार्यक्रमाची सांगता चिखली तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव यांनी केली व शेकडो कार्यकर्त्यांनी भारत माता की जय या घोषनेने बुलडाणा शहर दनाणुन गेले व तिथे एक क्रांतीचे देशभक्तीचे वातावरण तयार झाले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button